वैजापूर ता,०४
जगातील बहुतेक जेष्ठ नागरिक स्मृतिभ्रंश या विस्मरण आजाराने पछाडत आहेत. त्यांची विस्मरण शक्ती झपाट्याने वाढत आहे.हा स्मृतिभ्रंश आजार टाळण्यासाठी जेष्ठ नागरिकांनी अधिक बोलके बनावे
व हा आजार दूर ठेवावा तसेच त्यांनी अधिक कृतिशील बनून स्वतः सक्षम ,सुदृढ, निकोप व निरोगी रहावे असे वक्तव्य रविवार (ता,०३)रोजी जेष्ठ विधिज्ञ राजगोपाल मालपाणी यांनी केले.येथील पीएमश्री मौलाना आझाद विद्यालयात वैजीनाथ जेष्ठ नागरिक सेवा संघाची जेष्ठ नागरिकांची सभा जेष्ठ नागरिकांच्या वाढ दिवसाच्या अभिष्टचिंतनसाठी आयोजित करण्यात आली होती त्या प्रसंगी ऍड ,मालपाणी बोलत होते,ते पुढे म्हणाले की, जेष्ठ नागरिकांनी स्वतः च्या आरोग्य कडे जातीने लक्ष द्यावे,झेपेल तेव्हढे प्राणायम व योगासने करून शक्य तेव्हढे पायी फिरावे.दर सहा महिन्याला आरोग्य तपासणी करून वैद्यकीय सल्ल्याप्रमाणे स्वतः दक्ष रहावे असेही ते पुढे म्हणाले.या प्रसंगी अध्यक्षस्थानी संघाचे प्रकाशशेठ बोथरा होते.तर जेष्ठ पिठावर,व्यापारी संघाचे जेष्ठतम अध्यक्ष काशिनाथ शेठ गायकवाड,आधार जेष्ठ नागरिक संघाचे उत्तमराव साळुंके, चैतन्य जेष्ठ नागरिक संघ चे
साहेबराव साळुंके तसेच जेष्ठतम नागरिक गोपालदास आसर,श्री. एम.जी .गणोरे यांची उपस्थिती होती.
आरंभी भारत मातेचे पूजन व अभिवादन करण्यात आले.४१जेष्ठ नागरिकांचे वाढदिवस निमित्त शाल,गुलाब पुष्प देऊन अभिष्टचिंतन करण्यात आले. या प्रसंगी रविंद्रआप्पा साखरे,व सुरेश संत यांनी मनोगत व्यक्त केले तर अशोक धसे यांनी साने गुरुजी यांची प्रार्थना खरा तो एकची धर्म --सादर केली,संपतराव डोंगरे यांनी पसायदान सादर केले,सूत्र संचलन संघ सचिव धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले.आभार बाबासाहेब गायकवाड यांनी मानले.या प्रसंगी संचालक सुभाष बोहरा,बबनराव क्षीरसागर, भगवान सिंह राजपूत,मुकुंद शेठ दाभाडे, सेवा निवृत्त पोलीस अधिकारी सोपानराव निकम,नारायणी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षअशोक पवार खंडाळकर यांनी सहभाग नोंदविला.जेष्ठ नागरिक सेवानिवृत्त प्राध्यापक किसन बोरनारे,रामकृष्ण साठे,माजी प्राचार्य संपतराव साठे,अण्णासाहेब शेळके, सुदाम आप्पा गोंधळे, पी,वाय, चव्हाण श्री दिसले यांच्या सह जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(फोटो कॅप्शन-जेष्ठ नागरिक धोंडीरामसिंह राजपूत यांचे अभिष्टचिंतन करतांना अध्यक्ष प्रकाश शेठ बोथरा)
No comments:
Post a Comment